आज विदर्भातील आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन टाकले आहे, खरे तर येथील माती साधन संपत्तीने समृद्ध आहे ,येथील काळ्या सुपीक मातीत कापसाचे व संत्राचे चांगले पीक निघते ,पावसाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक आहे , देशातील महत्व्याच्या शहर व् इतर भागांशी विदर्भ well connected आहे. तरीही येथील शेतकरी आत्महत्या करत आहे याचे कारण म्हणजे शेतीवर आधारित उद्योगधंदे व नेतृत्वाचा अभाव।
पश्चिम महाराष्ट्राचे उदाहरण घेतल्यास लक्षात येते की सहकराने येथे कायापालट केला आहे ,दूध उद्योग ,साखर उद्योग ,सूत गिरण्या यातून शेतकऱ्यांना योग्य 'मोल' व इतरांना रोजगार मिळाला आहे. हे सुद्धा बरचसा भाग दुष्काळी असतांना .!!
विदर्भाचा विकास व्ह्यायचा तर सहकाराशिवाय तरणोपाय नाही , दूध ,कापूस व संत्रा आधारित उद्योग धंद्यांना येथे मोठी संधी आहे.स्वातंत्र्योत्तर काळात बराच काल व सध्या ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे आहे.यातून विकासाची संधी साधली जावी हीच अपेक्षा ..!!
No comments:
Post a Comment